Ad will apear here
Next
१०१ रुपयांच्या त्या ‘अनमोल’ भेटीने मुख्यमंत्री भारावले!
मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होणे, ही दर वर्षीचीच गोष्ट; पण यंदाच्या वाढदिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळालेल्या विशेष भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावून गेले आहेत. ती भेट फक्त १०१ रुपयांची आहे; मात्र तिचे मूल्य अनमोल आहे.

राज्यातील अगदी शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असणे, हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य. याच शेवटच्या घटकाकडून मुख्यमंत्र्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण भेट प्राप्त झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाल्याने मोलमजुरी करणाऱ्या त्याच्या पालकांनी कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १०१ रुपयांची मदत पाठविली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता. गंगापूर) येथील वेदान्त भागवत पवार हा पाच वर्षांचा मुलगा पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित होता. वेदान्तचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात, तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्यापरीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले; मात्र या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अवघड होऊ लागले. 

पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. या बालकाची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. नेवासा) येथे राहते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन या मुलावरील उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून तात्काळ एक लाख ९० हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदान्तवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे त्याला नवजीवन मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदान्तचे कुटुंबीय भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्रीमती रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले. त्यासोबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन म्हणतात... ‘आपण माझ्या मोबाइलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो, यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरूपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवीत आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’ (संपूर्ण पत्र बातमीच्या शेवटी दिले आहे.)

हे पत्र वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जन्मदिनानिमित्त त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने शुभेच्छा प्राप्त झाल्या; मात्र ज्या घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असतात. त्याच शेवटच्या घटकाचा प्रतिनिधी असणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाकडून शुभेच्छांसोबत प्राप्त झालेली ही छोटीशी, परंतु खूप मोलाची असणारी मदत आल्याचे पाहून मुख्यमंत्री सद्गदित झाले. 

मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रुपयांची देणगी
‘आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या आवाहनाचा सन्मान राखून विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे एक कोटी ७५ लाख रुपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZJJCC
 Sarvani prerna gheoun ashi madat karavi. Jenekarun asha anekana jeevdan milel..1
 खूपच हृद्य आणि माणुसकीचे दर्शन देणारा प्रसंग.....
दान देणारा आणि दान घेणारा दोघेही ग्रेट....1
 खूप हृदयस्पर्शी ! देणारा आणि घेणारा दोघांनाही उदंड आयुष्य लाभो !1
Similar Posts
मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच; अजित पवार उपमुख्यमंत्री मुंबई : कित्येक दिवस चाललेल्या चर्चांच्या फैरींनंतर एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाने अचानक दिशा बदलली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज सकाळी (२३ नोव्हेंबर) या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली
अवकाळी पाऊस पीक नुकसानभरपाईसाठी दहा हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाच्या भरपाईसाठी अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. नुकसानाच्या पंचनाम्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असून, यंत्रणा पोहोचली नसेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबाइलवर
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ : देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर झाला. आता राज्याचा अर्थसंकल्प सहा मार्चला सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणालाही मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले असून, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असे त्याचे नाव आहे
पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षण मुंबई : शेतीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आता राज्यात पेरणीपासून पिकाच्या काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षण करून, पीकवाढीशी संबंधित बाबींची संगणकीय प्रणालीद्वारे नोंद केली जाणार आहे. अशा प्रकारे ‘डिजिटल ट्रॅकिंग’ करणाऱ्या ‘महाॲग्रिटेक’ हा देशातील पहिल्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language